संभाजीराजे आणि कंठा प्रकरण शंभूराजांच्या चरित्रावर उडालेले शिंतोडे काहिही कारण असो, सत्य असो असत्य असो, पाप मग ते इतर कुणाचे असो...... इतिहासातील हे सर्व प्रकरण माथी मारायला छत्रपती संभाजी महाराज ही एकच व्यक्ती काहींना दिसते....! १ जून १६८१ च्या आसपास औरंगजेबाचा पुत्र अकबर हा हिंदवी स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला. संभाजीराजांना प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी अकबर आतुर झाला होता. पण संभाजीराजे त्याला भेटायला तातडीने गेले नाही. जून- जुलै १६८१ च्या सुमारास संभाजीराजांवर विषप्रयोग करण्याचा अयशस्वी कट झाला होता. अकबराने या कटाची बातमी संभाजीराजांना दिली. यामुळे संभाजीराजांना अकबराविषयी विश्वासची खात्री पटली आणि त्यांनी अकबराची भेट घेण्याचे ठरवले. १३ नोव्हेंबर १६८१ रोजी संभाजीराजे आणि अकबर यांची पाली येथील पादशहापुर येथे भेट झाली. त्यानंतर पुन्हा १६८२ च्या ऑगस्ट मध्ये संभाजीराजे आणि अकबर यांची भेट झाली. या दोन भेटीत केव्हातरी संभाजीराजांनी अकबराला एक हत्ती आणि एक पोवळ्याची माळ भेट म्हणून दिलेली होती. अकबराच्या प्रत्येक हालचालीवर संभा...