अशी माहिती जी प्रत्येक मराठ्याने वाचायला हवीच !

प्रत्येक मराठ्याने हे वाचायला हवंच !


आजचे मराठे शिवकाळातील मराठा सरदारांनी सांगितलेल, लिहिलेलं वाचत नाही, समजून घेत नाही हे दुर्दैव आहे !

कान्होजी जेधे म्हणजे शिवकाळातील एक मात्तबर सरदार घराणे. शहाजीराजांच्या सोबत अनेक लढाया लढलेले कान्होजी जेधे. शहाजीराजांच्या हुकुमावरून पुण्यात शिवछत्रपतींच्या सेवेत रुजु झालेल्या कान्होजी जेध्यांना कोण ओळखत नाही ?

अफजलखानाच्या वेळी खानास मदत करा असा आदिलशाही फर्मान आलेला असतानाही शिवरायांच्या सोबत उभे राहून आदिलशाहीने दिलेल्या वतनावर पाणी सोडलेले मातब्बर सरदार म्हणून कान्होजी जेधे इतिहासात प्रसिद्ध आहेत.

या जेध्यांच्या शिवकाळातील इतिहास प्रसिद्ध मराठा सरदाराच्या वंशपरंपरागत ऐतिहासिक नोंदी त्यांच्या जेधे शकावली व जेधे करिनात आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या सत्य नोंदी आपल्याला या शकावलीत सापडतात इतके हे महत्वाचे साधन. या मराठा सरदाराच्या ऐतिहासिक नोंदवहीत शिवछत्रपतींच्या जन्माची नोंद लिहिलेली आहे. ती नोंद अशी शके १५५१ शुक्ल संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीया  या हिंदू कालगणनेनुसारच ही नोंद आहे.

माझ्यासारख्या सामान्य मराठा तरुण मनात विचार येतो की, शिवकालातील मातब्बर मराठा सरदारांनी शिवजन्माची नोंद हिंदू तिथीनुसारच केलेली असताना आजचे मराठे इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती का साजरी करतात ?' शिवछत्रपतींच्या काळात इंग्रजी कालगणना या देशात अस्तित्वात नव्हती याचा हा स्पष्ट पुरावा असतानाही आंग्ल दिनांक १९ फेब्रुवारीचा हट्ट का ??

ज्या मराठा सरदारांनी त्यांच्या नोंद वहीत शिवजन्म तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला लिहिला आहे त्यांना आम्ही खोट का पाडत आहोत का ? ज्यांनी शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याकरिता रक्त सांडले त्या मराठ्यांचे आम्ही वंशज आज त्यां मराठा सरदारांनी लिहिलेल ऐतिहासिक कथन आम्ही का मानत नाही ?? आपलं ते खरं करण्यासाठी मराठा सरदारांच्या ऐतिहासिक नोंदीकडे दुर्लक्ष का केल जात आहे ? या मागे नक्की काय राजकारण आहे ?? ते राजकारण आजच्या मराठ्यांना ठाऊक आहे की नाही ?? जर ठाऊक आहे तर १९ फेब्रुवारीचा हट्ट का ???

सहज विचार करा ....
शिवकाळात शिवछत्रपतींच्या जन्मदिनी शिवरायांचे औक्षण करताना आऊसाहेब जिजाऊंनी कुठल्या इंग्रजी कैलेंडर मध्ये शिवरायांचा जन्म दिनांक पाहिला असेल काय ? लक्षात ठेवा तेव्हाही हिंदू कालगणना म्हणजे तिथीचीच पद्धत होती.... शिवछत्रपतींच्या नंतर मराठ्यांनी त्यांचं उभं आयुष्य ज्या इंग्रजांशी लढून घालवल आज त्याच मराठ्यांचे वंशज शिवछत्रपतींची जयंती इंगजांच्या कालगणनेनुसार साजरी करत आहे हे दुर्दैव नाही का ? 


ज्या मराठ्यांमुळे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला आकार आला, बळ मिळालं त्याच मराठा सरदारांना, त्यांच्या ऐतिहासिक नोंदींना आपण दुर्लक्ष करून काय मिळवणार आहोत ?  उद्या जर आजच्या मराठ्यांना कोणी विचारल की,,,,, "शिवकाळातील तुमच्या मराठा सरदारांच्या नोंदीत शिवजन्म तर फाल्गुन वद्य तृतीयेला लिहिला आहे मग तुम्ही इंग्रजी तारखेला का करता ?"

श्रीशिवजयंती Global करण्याच्या नादात आपण आपला इतिहास, संस्कृती विसरून इंग्रजांचें खरकटें उचलत तर नाही ना याचा विचार करा ..

                      आपला भाऊ
                   बळवंतराव दळवी


____________________________

आमचे इतर सोशल मिडिया AC लिंक
-----------------------------------------------

For more videos go to -
बळवंतराव दळवी
https://www.youtube.com/c/BalwantraoDalvi

Like us on Facebook at -
बळवंतराव दळवी
https://www.facebook.com/balwantrao.dalvi


Like our Facebook page at -
शिवचरित्र आणि सह्याद्री
https://www.facebook.com/shivcharitranisahyadri/

Follows us on Twitter at -
https://twitter.com/DalviBalwantrao?s=08

Read & Like My Blog:-
http://balwantraodalvi.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

रायगड असाही पहावा ....

ऐतिहासिक कालगणना अभ्यास

......असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!